राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीत तब्बल ९,१३३ रिक्त पदांची भरती! Agriculture Department Recruitment 2025

Agriculture Department Recruitment 2025: राज्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीत एकूण २७,५०२ पदे मंजूर आहेत. मात्र, सद्यस्थितीत केवळ १८,३६९ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ९,१३३ पदे रिक्त आहेत. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संबंध असतो, ‘गट-क’मधील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे आढळले आहे.

रिक्त पदांचा विभागवार तपशील:

गट-क: कृषी पर्यवेक्षक (७३), कृषी सहायक (१,६९३), अधीक्षक (५८), तसेच लिपिक, टंकलेखक, अनुरेखक, वाहनचालक

गट-ड: नाईक, शिपाई (१,९८९), क्लीनर, माळी (५५९), प्रशिक्षित मजूर (२९९), मदतनीस, परिचर

प्रशासनिक पदेही रिक्त

राज्यात डिसेंबर २०२४ पर्यंत कृषी आयुक्त पद रिक्त होते. जानेवारी २०२५ मध्ये सूरज मांढरे यांनी पदभार स्वीकारला, मात्र अद्याप संचालक आणि चार कृषी सहसंचालक यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय, प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी आणि कृषी अभियंतेही अपुऱ्या संख्येने कार्यरत असल्याने विभागीय कामकाजावर परिणाम होत आहे.

रेणुका माता मल्टीस्टेट मार्फत 140 पदांची भरती! अर्ज अंतिम दिनांक 18 मार्च Renuka Mata Multistate Recruitment 2025

रिक्त पदांमुळे कार्यभाराचा ताण

कृषी विभागातील रिक्त पदांमुळे मोजक्या अधिकाऱ्यांवर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात वाद निर्माण झाले होते. विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विभागनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ही आहेत रिक्त पदे

महत्त्वाची रिक्त पदे

संचालक: १

कृषी सहसंचालक: ४

अधीक्षक कृषी अधिकारी: ९

प्रशासकीय अधिकारी: ३

लेखा अधिकारी: ११

स्वीय सहायक: ६

कृषी अधिकारी: ३९८

कृषी कनिष्ठ अभियंता: ८

कृषी पर्यवेक्षक: ७३

कृषी सहायक: १,६९३

सहायक अधीक्षक: ४२

वरिष्ठ लिपिक: १३१

लिपिक/टंकलेखक: १,०९१

अनुरेखक: १,९००

सहायक ग्रंथपाल: १

लघुलेखक (उच्चश्रेणी): ८

लघुलेखक (निम्नश्रेणी): ५२

लघुटंकलेखक: ५२

वाहनचालक: ४७१

नाईक/दप्तरी: ७२

शिपाई/रखवालदार: १,९८९

क्लीनर: १३

माळी/रोपमळा मदतनीस: ५५९

प्रशिक्षित मजूर: २९९

प्रयोगशाळा सहायक/परिचर: २१

कृषी विस्तार कार्य प्रभावी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी ही रिक्त पदे भरणे अत्यावश्यक आहे.

Army Agni Veer Recruitment 2025 | खुशखबर भारतीय सेना दलात अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर! अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल